बुलढाणा / शेतकऱ्यांसाठी पाणी पाणी म्हणत युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने ऐन होळीच्या दिवशीच विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडलीय. कैलास नागरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी तीन पाणी चिठ्ठी लिहिली आहे. कैलास यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर सरकारवर संतापही व्यक्त केला जातोय. *काय लिहिलय चिठ्ठीत?* कैलास नागरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या तीन पानी चिठ्ठीत त्याने आत्महत्येच कारण नमूद केलय. शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरणावर संताप व्यक्त करत आपण हताश झाल्याचं म्हटलय. त्यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केलेय. *शेतकऱ्यांसाठी कैलाश यांचा लढा* युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलाश नागरे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत होते. आधुनिक आणि पारंपरिक यांचा तंत्रज्ञानाच्या साथीने मेळ घालत बाजारपेठेचा अभ्यास करून शेतीची कास धरली तर ती फायद्याची ठरू शकते हे ते शेतकऱ्यांना दाखवून देत होते. शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या अनेक आंदोलनामध्ये कैलाश नागरे प्रामुख्याने सहभागी असत. खडक पूर्णा जलाशयातील पाणी देऊळगाव रागा परिसरातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठीही ते लढा देत होते. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने हताश होऊ लागले. सरकारकडे मागणी अर्ज विनंत्या आंदोलने करूनही पाणी मिळत नसल्याने अखेर त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर सरकारवर संताप व्यत केला जात आहे.
सरकारच्या नाकर्तेपणाचा बळी;काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट
,”खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज कैलास नागरेंनी आपला जीव गमावला.देऊळगावराजा तालुक्यातील कैलास नागरे या शेतकऱ्याने विष पिऊन दुर्दैवी आत्महत्या केली. गेल्या डिसेंबर महिन्यात खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शिवणी आरमाळ, अंढेरा, गुंजाळा व मेंढगाव या चार पाझर तलावांमध्ये नदीजोड प्रकल्पाद्वारे सोडावे,या मागण्यांसाठी देऊळगावराजा येथील तलावात श्री.कैलास नागरे यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर प्रशासनाने त्यांना आश्वासने दिली होती, मात्र या आश्वासनांचे पुढे काही होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्याने या प्रशासनाला कंटाळून, या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची प्रशासन आणि सरकारला लाज वाटली पाहिजे.”जो पर्यंत मी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकार ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत माझा मृतदेह ताब्यात घेऊ नका.” असं या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटून गेली, मात्र आजही जर शेतकऱ्यांना व्यवस्थेच्या किंवा सरकारच्या नाकर्तेपणामुळे चिठ्ठी लिहून आत्महत्या करावी लागत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. कैलास नागरे यांचं बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही.ऐन होळीच्या सणा दिवशी पाण्यासाठी शेतकऱ्यांना जिव गमवावा लागत असेल तर,शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा न देऊ शकणाऱ्या सरकारला यांची किंमत मोजावीच लागेल! शेतकऱ्यांची पोरं या जुलमी व्यवस्थेची होळी केल्याशिवाय राहणार नाहीत. ”
– रुपेश शंके
युवा जिल्हाध्यक्ष-शेतकरी संघटना लातूर